परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. - १
स्वर्गात जाताच टिळक दिसले,
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले,
- टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलय का काही?
म्हंटल, छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने सुभाषबाबु आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? - २
मी म्हणालो,
नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली?
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद कश्मीर होतो! - ३
तितक्यात....
दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो,
म्हंटल 'तात्या', उभ्या जन्माचं पुण्य पावलो,
म्हणाले, सध्या तरी सगळं कसा निवांत आहे,
इथे कॉंग्रेसवाला नाही तर सगळं कस शांत आहे - ४
त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते काय सौ्धातुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिंचा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले,
पण घडल भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
- काय रे? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमिजी केली
तुमची अक्कल, तेंव्हा सांगा कोठे चरायला गेली? - ५
मान वर करायची माझी हिंमत होत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, आम्हाला तुमची स्वप्न कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही.
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावाज हेरतात,
आणि ब्र म्हणायचा अवकाश, गाढवाचे नांगर फिरतात. - ६
सगळे ऐकुन महाराजांच्या गालचे कल्ले थरारले,
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यात पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खावेगाने थरथरले,
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले - ७
पाय लटपटले....
वाटल आता, कंबख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समज,
पण न्याय-कठोर असले तरि हृदय त्यांचे 'रीते' नव्हते,
अन मेलेल्यांनाच मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते. - ८
म्हणाले, फक्त नाव सांग, खाली जाउन समाचार घेतो,
म्हणालो राहु द्या 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्यांच्या जिवाशी खेळतो. - ९
फक्त एकच काळवीट मारले!म्हणत आपले माजोरडे नाक मुरडतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातलं पाणी अडवल,
कळलं मला हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल - १०
मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............
अहो आश्चर्यम?? स्वर्गात मला औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला
जिन्हा सुध्दा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल - ११
- सौरभ वैशंपायन
6 comments:
Wah !Farach chaan. Last lines are wonderful.
-Vidya.
Very intelligent!
क्या कहने! बहुत खूंब!!
छान ! अप्रतिम
कल्पनाशक्तीला तोड नाही.
Baki sagale cchan pan pad-path kay zopanya sathi asatat? Prantik pakshyan mule Rashtracha vichar hot nahi ...hi pan ek khant aahech na?
:)....आम्ही निःशब्द झालो...
Post a Comment