Tuesday, February 1, 2022

प्रश्न


मनात दबली काही रुखरुख,
न दिसणारे ठसठसते वळ,
हाताशी आधार न कुठला,
प्रत्येक वळणावरती भोवळ - १

पूल सांधणे अजुनी बाकी,
हितगुज बाकी आहे पुष्कळ,
पाऊल पहिले टाकावे कोणी?
या प्रश्नाशी अडले केवळ - २

- सौरभ वैशंपायन

Saturday, January 15, 2022

"मैं तुझे फिर मिलूँगी" - > "भेट आपुली होईल अवचित"



















मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
ख़ामोश तुझे देखती रहूँगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

या सूरज की लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूँगी
या रंगो की बाँहों में बैठ कर
तेरे केनवास पर बिछ जाऊँगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे ज़रुर मिलूँगी

या फिर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूँगी
और एक शीतल अहसास बन कर
तेरे सीने से लगूँगी

मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है

पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

मैं तुझे फिर मिलूँगी!!

- अमृता प्रीतम

**************

भेट आपुली होईल अवचित
कल्पनेतुनी असेल कदाचित
प्रेरणा बनुनी नव सृजनाची
कागदावरती होईन अंकित
निरखित राहीन मी एकटक
अबोल अगम्य तरी परिचित
भेट आपुली होईल अवचित
कल्पनेतुनी असेल कदाचित

किंवा बनुनी सुर्यशलाका
खुलविन रंग हलका-हलका
त्या रंगांच्या मिठी मधुनी
कागदावरती जाईन पसरत
कसे कुठे मजला नाही ठाऊक
पण तरीही भेट होईल खचित

बनेन अथवा मी कारंजे
ओढ्या मधुनी खळाळते जे
त्या पाण्याचे रूप घेऊनि
जाईन तुझ्या तनुवर घसरत
शीतल सुखदसा अनुभव बनुनी
हृदयी तुझिया जाईन गुंतत
 
नसेल मजला काही ठाऊक
मात्र एक जाणते निश्चित
काळाच्या या असीम पटावर 
सदैव चालेन तुझ्याच सोबत
या देहाच्या राखे संगे
जळून जाई सारे संचित


काळामधल्या क्षणाक्षणापरी 
आठवणींचे धागे मजबूत
त्या धाग्यांना निवडत जाईन
उचलून घेईन त्यांना मोजत
भेट आपुली होईल अवचित
कल्पनेतुनी असेल कदाचित


भेट आपुली होईल अवचित!!

Friday, January 14, 2022

समास


गोऱ्या भाली रेखलेली, 
काळ्या बटांची आरास,
मिठीतुन उलगडे, 
दोन देहांचा समास. - १


शब्द झाले मुके मुके,
गुंते श्वासामध्ये श्वास,
तनुवरी तुझ्या चाले,
माझ्या ओठांचा प्रवास. -२


उतू गेला नभी चंद्र,
फुले वसंताचा मास,
दोन क्षणांमध्ये दाटे,
युगायुगांचा उल्हास. - ३


नाही फुलांचा सुवास,
तरी गंधाळली आस,
दिनभर देहभर आता,
तुझ्या स्पर्शांचेच भास. - ४

 - सौरभ वैशंपायन

स्पंदन

 

एकांताची वेळ असावी 
चंद्र दडावा मेघांमागे,
अबोल रात्री अवचित व्हावे 
दोघांमधले स्पंदन जागे. - १


कानामागील केसांमध्ये
जड थोडासा श्वास जिरावा,
अवघडलेल्या मौनामध्ये 
शरणागत हुंकार विरावा. - २


अनोळखीश्या दो देहांना
क्षणात यावी अनाम भरती,
उत्सुक उत्सुक हात फिरवे
अंगांगातील वळणांवरती. - ३


अधीर आसुसल्या ओठांना
ओठांकडूनीच धीर मिळावा,
संकोचाच्या पडद्यामागील
कुशीत दडला अर्थ कळावा. - ४

 - सौरभ वैशंपायन

Thursday, October 14, 2021

तमस

बहुत समीप मृत्यु के,
पहुँचा दशानन रावण,
छाया घनघोर अंधेरा,
घिरा विकराल ग्रहण ।।१।।

वड़वानल सा भव्य,
उठा मायावी रावण,
डगमग कापती धरा,
हुए क्रुद्ध नारायण ।।२।।

चमके धनुष पर प्रभु के,
अमोघ शक्ति का बाण,
हरने थे अंतिम जिसको,
उन्मत्त असुर के प्राण ।।३।।

देखोss
देखो ...
उठी मृत्यु की लहर
तमस का प्रहर
जगत पर छाया ।।४।।

वो
छूटा धनुष से तीर
अंधेरा चिर
त्रिलोक थर्राया ।।५।।

हुआ 
मुक्त सत्य मार्तण्ड
विजय जो प्रचंड
प्रभु ने पाया ।।६।।

 - सौरभ वैशंपायन

Friday, July 23, 2021

वैकुंठाचा राजा


वैकुंठाचा राजा त्याचे खेळच वेगळे,
एका विटेवरी नांदे पहा वैकुंठ सगळे।

वैकुंठाचा राजा जात्यावरी धान दळे,
जनीच्या ओवीतून ऐके कौतुक आगळे।

वैकुंठाचा राजा पण मुलाखाचा विसराळू,
भक्तापायी घर विसरे भावभुकेला मायाळू।

वैकुंठाचा राजा कोण दुजा असा कृपाळू,
योगीयांचा राणा करी ब्रह्मविद्येचा सुकाळू।

वैकुंठाचा राजा बघा महालक्ष्मी पाय चुरे, 
भक्ताच्या शब्दापायी त्याला एक वीट पुरे।

 - सौरभ वैशंपायन

Tuesday, May 11, 2021

संवाद

लहान बाळाने त्याच्या मुठीत आजोबांचे बोट पकडलेले आहे असा दोघांच्या फक्त हातांचा एक फोटो काही महिन्यांपूर्वी बघण्यात आला तेव्हा सुचलेली कविता आज ड्राफ्ट साफ करताना पुन्हा समोर आली. त्या क्षणी आजोबा नातवंडाशी/पतवंडाशी काय संवाद साधत असतील -

=====

एक चिमुकला स्पर्श मिटवतो,
आपुल्या काळामधले अंतर,
वृद्धत्व नव्हे हे दुजे बालपण,
दिलेस मजला याचे प्रत्यंतर.

अनुभवांच्या छिन्नीने त्या,
सुरकुत्या उमटल्या अंगांगावर,
खाच-खळगे टाळून साऱ्या,
ओतू बघतो तव हातांवर.

आपुले नशीब घडवी आपण,
की सटवाई लिही खरोखर?
एकाकडूनी दुसऱ्या हाती,
चालत राही डाव निरंतर.

काही सरले काही उरले,
आयुष्याचा खेळून चौसर,
माझ्या डोळ्यांमधली देतो,
तुजला काही स्वप्ने सुंदर.

- सौरभ वैशंपायन

कोई और नहीं मैं काल हूँ।


"काळ" आणि "मृत्यू" हे कायम मानवासाठी कुतूहलाचे अत्यंत गूढ विषय राहिले आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काळ आणि मृत्यू यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. दोघांना ओलांडून जाता येत नाही कारण त्यांना ओलांडले की परतीची वाट नाही.

मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी मनुष्य शेकडो - हजारो वर्षं धडपड करतो आहे पण त्याला यश आलेलं नाही आणि येईल असं वाटत नाही. Time machine - कालयंत्र ही संकल्पना देखील कथा, कादंबरी आणि चित्रपटांपुरतीच.

मुळात "काळ" अशी काही गोष्ट किंवा चौथी मिती खरंच अस्तित्वात आहे की केवळ मानवाने गणिताच्या आणि इतर गोष्टींच्या आधाराने आखलेली एक संकल्पना आहे? इथपासून प्रश्नांची सुरुवात आहे.

आपल्या संस्कृतीत काळपुरुष अशी संकल्पना आहे. भावनिक दृष्ट्या काळपुरुष हा जणू गीतेतील स्थितप्रज्ञ आहे चांगले-वाईट, जय-विजय, प्रलय-सृजन याकडे तो समानदृष्टीने बघतो पण लौकिक दृष्टीने तो सर्वात अस्थिर आणि निरंतर गतिमान आहे.

पुढील कविता समजा उद्या काळपुरुष बोलू लागला तर काय म्हणेल याची केलेली कल्पना आहे. 
==========

अणु का अल्पांष हूँ मैं, 
मेरा अल्पांष है ब्रह्मांड ,
जीव-जंतु पलते मुझमें, 
दृश्य यह देखो प्रकांड।
मैं लय भी हूँ, प्रलय भी हूँ,
जन्म भी मैं, विलय भी हूँ,
मैं भ्रम भी हूँ, मैं भ्रांति हूँ,
शोर भी मैं, मैं शांति हूँ।
जो कट ना सके वो जाल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - १

हर क्षण बदले वह वेश हूँ मैं,
बाटो फिर भी शेष हूँ मैं,
जो सोचो वह आकार हूँ,
हूँ सपना? या साकार हूँ?
मैं हूँ भूत और हूँ भविष्य,
उलझे सुर-असुर-मनुष्य,
तुम सबका मैं इतिहास हूँ,
जो अतृप्त रहे वो प्यास हूँ।
शायद खुद का ही खयाल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - २

किसी की अपूर्ण आस हूँ,
या एक अंतहीन प्रवास हूँ,
मैं इस सृष्टि की नींव भी हूँ,
मैं हूँ सजीव, निर्जीव भी हूँ।
जो पूर्ण ना हो वो तलाश हूँ,
मैं ही अंधेरा, मैं ही प्रकाश हूँ,
खोजो आकाश, खोजो समुन्दर,
ढूंढो मुझको खुद के अंदर।
मन में गहरा पाताल हूँ,
कोई और नहीं मैं काल हूँ। - ३

घड़ी से तुम मुझ को बाँधोगे?
पर मेरी सीमाएँ कैसे लाँघोगे?
बाल्य और यौवन मैं देता हूँ,
सृष्टि को जीवन मैं देता हूँ।
विष और अमृत दोनों पीकर,
हर रोज मरा और हुआ अमर,
क्या हूँ दिशाहीन? या दृढ़ हूँ मैं?
पार्थ की तरह दिग्मूढ़ हूँ मैं।
मैं खुद के लिए एक सवाल हूँ
कोई और नहीं मैं काल हूँ। - ४

 - सौरभ वैशंपायन

सन्नाटा

.
सन्नाटा हूँ चौतरफा छाने में,
थोड़ी देर लेता हूँ,
पर जब छा जाता हूँ तब,
मैं सबकुछ घेर लेता हूँ। - १

खंडहरों में बसता है घर मेरा,
वहाँ गीत उदासी के गाता हूँ,
बिछु, साँप, उल्लू आते-जाते,
बाकी खुद को अकेला पाता हूँ। - २

कोई आहट दूर से आती मुझको, 
उसे बुलाने रोता - चिल्लाता हूँ,
फिर चार दीवारों से टकराकर मैं,
खुद में चुपचाप समा जाता हूँ। - ३

सन्नाटा हूँ! पर शोर भरा है मुझ में,
ढेर पर बैठो, तुम्हें जरा सुनाता हूँ,
आगे पीछे ऊपर नीचे पाओगे मुझको,
धीरे धीरे पर सबको बहुत सताता हूँ।- ४

चुपकर थामे हाथ सुने महल घूमता हूँ,
शाश्वत नहीं है जीवन याद दिलाता हूँ,
सन्नाटा हूँ मैं पुराने साज अपनाता हूँ,
सन्नाटा हूँ मैं सैकड़ों राज दफनाता हूँ। - ५

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, October 17, 2020

अर्थ-सकारात्मक व्हा

 

कोरोनामुळे जगाचं रूप बदलून गेलं आहे. अजूनही बरंच काही बदलणार आहे. काम करण्याच्या, जगण्याच्या पद्धतीत फरक पडत चालला आहे. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या दिनाचर्येचा भाग होऊ लागल्या आहेत. आणि ज्या गोष्टी रोजचा जगण्याचा भाग होत्या त्या तितक्याश्या महत्वाच्या राहिलेल्या नाहीत.

सुरुवातीला हे सगळं महिना दीड महिन्यात आटोक्यात येईल असं वाटत होतं पण अर्धा ऑक्टोबर संपला पण भारतभर परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारी यंत्रणा, वैद्यकीय सेवा, पोलीस, शास्त्रज्ञ विविध समाजसेवी संस्था जीव तोडून काम करत आहेत पण काही ठिकाणी साधनांची कमतरता, काही ठिकाणी पैश्यांची कमतरता, काही ठिकाणी निष्काळजीपणा तर काही ठिकाणी पूर्णतः गोंधळ यामुळे गोष्टी कठीण बनल्या आहेत.

या सगळ्यात सर्वात जास्त प्रभाव पडला आहे तो प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर. आर्थिक फटका अर्थातच सगळ्यांनाच बसला आहे पण जे अतिश्रीमंत, श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होईल इतका फरक पडलेला नाही मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरिबांना जोरदार चटका बसलेला असून अगदीच हातावर पोट असलेले तर बिचारे पार होरपळले गेले आहेत.

या आपत्तीतून सावरल्यावर यातून धडा घेऊन पुढे सरकारने आपल्या प्रशासकीय, वैद्यकीय, आर्थिक, आपत्कालीन यंत्रणा भविष्यात असं संकट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी सज्ज करणे आवश्यक आहे. सरकार शिवाय सामान्य माणसाने देखील आपापली जबाबदारी उचलणे आवश्यक आहे. 

वरती म्हंटल्याप्रमाणे सर्वांनाच आर्थिक चिमटा बसला आहे. यातून सर्वांनीच आणि त्यातूनही मुख्यतः मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तींनी भविष्याचा विचार करून काटेकोर आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या या लेखाचा रोख मुख्यतः मध्यमवर्गीय आणि गरिबांकडे आहे. अतिश्रीमंत अथवा अतिगरीब या दोन्ही टोकांच्या बाबतीत कुठलेही भाष्य करण्यास अथवा मैत्रीपूर्ण सल्ला देण्यास मी असमर्थ आहे असं मला वाटतं.

मी स्वतः आर्थिक नियोजनाची सुरुवात फारच उशिरा म्हणजे माझ्या वयाच्या तिशीत केली. ती सुरुवात मी किमान पंचविशीत करायला हवी होती असं आता राहून राहून वाटतं. असो, वीस ते तीस दरम्यान असलेल्या सर्व तरुणांना मी हे सांगू इच्छितो की शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितकं आर्थिक नियोजन करायला सुरवात करा (मग तुम्ही शिकत असाल आणि घरून पॉकेटमनी जरी मिळत असेल तरी) जाणकारांकडून मार्गदर्शन घेऊन त्यातूनही सुरुवातील SIP आणि तसे विविध गुंतवणुकीचे सोपे पर्याय जाणून घ्या व गुंतवणूक करायला सुरुवात करा. जर खांद्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी नसेल तर उलट शक्य तितकी अधिकाधिक गुंतवणूक करा जेणेकरून तिचा भविष्यात फायदा होईल. 

लेख वाचणाऱ्या सर्वांनी किमान एक गोष्ट ध्यानात ठेवून साध्य करण्याचा प्रयत्न करा की आपल्याला घरखर्चाला दर महिना जितका खर्च येतो (महिनाभराचा किराणा, सर्व बिले, फी, असल्यास औषधे) तो "जीवनावश्यक" खर्च तितका जाणून त्यावर अजून थोडी रक्कम (उदाहरण म्हणून महिन्याला या सगळ्याला १७-१८ हजार रु लागत असल्यास वरचे २ टाकून २० हजार) ... असे किमान ३ महिन्याचे बफर (म्हणजे साधारण ६० हजार रुपये) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवा अथवा हाताशी तितकी रक्कम असल्यास बाजूला काढून ठेवा. हे साध्य करण्यासाठी काहींना एका झटक्यात जमेल काहींना कदाचित दोन वर्ष निघून जातील पण हरकत नाही सुरुवात तर करा. वाटल्यास हे बफर सहा महिन्यांपर्यंत वाढवता आले तर उत्तमच पण आत्तासारखे कुठलेही आर्थिक संकट येत नाही तोवर याला हात लावायचा नाही म्हणजे नाही. या फंडाचा फायदा असा होईल की न होवो पण काही कारणाने दोन तीन महिने उत्पन्नाचा स्रोत आटला अथवा थांबला तरी आपण आणि कुटुंब त्यातून तरू शकेल व आर्थिक ताण नसल्याने शांत डोक्याने परिस्थिती हाताळता येईल.

असा बफर तयार झाला की गुंतवणुकीचे अथवा आर्थिक नियोजनाचे पर्याय शोधत राहावेत. सर्वात जास्त आणि झटपट खर्च होणाऱ्या काही कारणांपैकी २ अत्यंत महत्वाची कारणे म्हणजे शिक्षण आणि अनपेक्षित आजारपण अथवा अपघात. त्यांचाही विचार करून ठेवणे आवश्यक आहे.

ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी शक्य झाल्यास मुलांच्या नावे दर महिना थोडी थोडी गुंतवणूक करावी. आजकाल अगदी पाचशे रुपये महिनापासून गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुन्हा काल्पनिक उदाहरण घेऊ समजा ते मूल जेमतेम वर्षभराचं आहे आणि महिना फक्त ५०० रु गुंतवणूक केलीत तरी वर्षाचे ६ हजार. त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षीपर्यंत म्हणजे पुढील २० वर्ष दर महिना फक्त ५०० रु गुंतवले तरी मुद्दलच सव्वालाखांच्या आसपास होऊ शकेल. गुंतवणुकीच्या विविध पर्यायानुसार कमीतकमी व्याज धरूनही त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च निश्चित करता येईल. इथे मुद्दा इतकाच आहे की मूल जितकं लहान असताना आपण त्याच्या नावे गुंतवणूक करू तितकं चांगलं.

इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे देखील मृत्यू, आजारपण, अपघात अशावेळी उपयोगी पडतात. आजकाल महिना ७००-८०० रुपयांचा मासिक हप्ता भरून ५० लाखांपर्यंतचे संरक्षण देणारे टर्म इन्शुरन्स/हेल्थ इन्शुरन्स अगदी सहज ऑनलाइन मिळतात. त्यातील तज्ञांशी बोलुन अधिक जाणून घेऊ शकता.

रोजचा खर्च लिहून ठेवायची सवय करा. अगदी एक रुपयाचे चॉकलेट खाल्ले तरी नोंद झालीच पाहिजे. यात कंजूसपणा किंवा कमीपणा नसून घामाच्या एकेका रुपयाला कुठे पाय फुटले याचा ट्रॅक ठेवणे इतकाच याचा उद्देश. आजकाल कॉम्प्युटर/मोबाईल मध्ये अशी applications किंवा excel sheets असतात. त्यात साधे कारण आणि पुढे जमा-खर्चाचे ३ रकाने केले तरी हे सहज जमते. सुरुवातील महिना दीड महिना हा ट्रॅक ठेवणे कठीण जाते कधी कंटाळा येतो कधी विसरायला होतं पण विश्वास ठेवा एकदा सवय लागली की डोक्यात हिशोब बसायला लागतो. महिन्याच्या सुरुवातीला बँकमधे, खिश्यात, असल्यास ई-वॉलेट मध्ये किती पैसे आहेत, कुठे कधी कसे किती पैसे खर्च झाले? त्यातले गुंतवणुकीत किती ठेवले, आवश्यक खर्च किती, अनावश्यक खर्च किती झाला व महिनाअखेर शिल्लक किती हे एका क्लिकवर समजतं. मी स्वतः गेली काही वर्षे हे करतो आहे आणि माझ्या मित्र- मैत्रिणींना हे करण्याचा सल्ला देतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे केलेली गुंतवणूक व त्याची कागदपत्रे ही घरातील किमान एका माणसाला माहीत असावी याची काळजी घ्या.

लक्षात ठेवा पैसा, आजारपण, अपघात आणि मृत्यू या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. आपले आर्थिक नियोजन जितके चांगले तितकी किमान एक बाजू शक्य तितकी सावरता येते. अथवा आजारपण किंवा अपघात यात पैसा उपयोगाला येतो. मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकतो. 

पैसा हे सर्वकाही नसतं पण पैसा हे खूप म्हणजे खूप काही असतं. मृत्यू अथवा अपघाताचा नकारात्मक विचार न करता काही अप्रिय घटना घडलीच तर त्यातूनही आपण अथवा कुटुंब सावरले पाहिजे हा "अर्थ-सकारात्मक" विचार नक्की करा.

 -  सौरभ वैशंपायन